Wednesday, January 9, 2019

कधी वाटते...

कधी वाटते आपल्यासाठी
जगात कोणी नाही,
तर कधी वाटते आपल्याच साठी
आहे सर्व काही.

 कधी होते मन उदास इतके
काहीच बोलता येत नाही,
तर कधी वाटते इतके बोलावे
की शब्दच पुरत नाही.

 कधी मनात ढग
येतात दाटून आठवांचे,
कधी होते मन हळवे आणिक
फुटतात बांध भावनांचे.

कधी तरी मनाला कोणाचा तरी
खुप राग येतो,
मग वाटते उगाच
आपण दुसर्यांना दोष देतो.

उगाच आपण स्वतःला
एकटे म्हणवून घेतो,
नंतर कळते आपल्यासाठी
कुणीतरी जगत असतो.

असावे आयुष्यात कुणीतरी
समजावून घेणारे,
स्वप्नांचे आपले जग
अलगद पेलून नेणारे....   
Written by Gaurav Shashikant Kumbhar

No comments:

Post a Comment