Wednesday, January 16, 2019

माझी कविता


आठवणी... 

वणवण करुन आपल्या हातात उरतेच काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय?

 घेणारे तर खुप असतात देणाराच नसतो,
 ऐकणारे ही असतात पण समजणारा नसतो,
 देऊन घेऊन बोलुन ऐकुन कोण कुणाला पुरते काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय?

 देह दिला म्हणून कोणी त्याचे आभार मानत नाही,
 सुख नाही दिले म्हणून त्यालाच बोलतात सर्व काही,
 सुख दुःख आपले कर्म, त्याच्या हातात असतेच काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय? 

 प्रेमाची ही भाषा नाही कोणाला कळत,
 मैत्रीमध्ये सुद्धा बसतात एकमेकांना जाळत,
 प्रेम मैत्री माया आपुलकी सगळे स्वप्नातच असते काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय?

 दुसर्यावरती जीव लावुन आपले मन रडत असते,
 ज्याच्यावरती जीव लावला त्याला मात्र काहीच नसते,
 सगळे प्रयत्न संपले तरी मनातली आशा संपत नाही,
 वणवण करुन सुद्धा हाती काहीच उरत नाही....

 ना मित्र ना माया ना आपुलकी ना प्रेम,
 माणुस सरल्यानंतर सगळे रडतातही सेम,
 काय उपयोग या आयुष्याचा ज्यात फक्त चिंताच आहे,
 कोणी नाही म्हटलं तरी निदान आठवणींची तरी सोबत आहे...     

कवि -गौरव शशिकांत कुंभार 

No comments:

Post a Comment